Publish Date: Tue, 16 Jul 2019 (14:57 IST)
Updated Date: Tue, 16 Jul 2019 (15:17 IST)
झाड झुडपांचे मनुष्याच्या जीवनात व इतर सर्व जीव जंतूसाठी फारच महत्त्व आहे. यामुळे आम्हाला फक्त शुद्ध वायूच नव्हे तर सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. झाड झुडपं आमच्या जीवनात सुख समृद्धी आणतात आणि आमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण करतात. नेहमी आम्ही पिंपळ, वडाच्या झाडाची पूजा करत असतो आणि हे झाड आमच्या सर्व इच्छा जरूर पूर्ण करतात. तर जाणून घेऊया कोणते रोप लावल्याने काय फायदे मिळतात....
तुळशीचे रोप
तुळस घरात असणे फारच योग्य मानली जाते, तुळशीची पूजा जवळपास प्रत्येक घरात होत असते. या रोपाला घरात लावल्याने वातावरण शुद्ध होत आणि घरात सुख शांतीचे वातावरण बनत.
जांभळाचे झाड
वास्तुशास्त्रानुसार जांभळाचे रोप लावल्याने सौभाग्य तसेच कन्या रत्नाची प्राप्ती होते.
पलाशाचे झाड
जर तुम्ही संतानं सुखापासून दूर असाल तर पलाशाचे वृक्ष लावायला पाहिजे.
काटेरी वृक्ष
काटेरी वृक्ष दारासमोर ठेवल्याने कायम शत्रूभय राहत.
पिंपळाचे वृक्ष
जलाशयाजवळ पिंपळाचे वृक्ष असल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि जी व्यक्ती जलाशयाजवळ पौधारोपण करतो त्याला पुण्यप्राप्ती होते.
कडुलिंबाचे वृक्ष
कडुलिंबाचे वृक्ष लावल्याने मनुष्य दीर्घायू होतो आणि सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर सदैव कायम राहते.
अशोकाचे वृक्ष
अशोकाचे वृक्ष लावल्याने दुःखाने मुक्ती मिळते.
धनलाभासाठी मनीप्लांट
मनी प्लांटचा पौधा धन संबंधित लाभ प्रदान करतो.
वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की कोणते ही वृक्ष घराच्या प्रवेश दारासमोर नाही लावावे. त्याशिवाय ज्या भूमीवर पपीता, आवळा, पेरू, डाळिंब, पलाशाचे वृक्ष असतात ती जागा वास्तुशास्त्रात फार योग्य मानली जाते.
webdunia
Publish Date: Tue, 16 Jul 2019 (14:57 IST)
Updated Date: Tue, 16 Jul 2019 (15:17 IST)