Publish Date: Sun, 08 Mar 2020 (14:22 IST)
Updated Date: Sun, 08 Mar 2020 (10:26 IST)
सुधा मूर्ती या एक भारतीय सामाजिक कार्यकर्ता आणि सुप्रसिद्ध लेखिका आहे. त्याचे काही सुविचार.....
1 "जीवन हे परीक्षा रुपी असते. येथे अभ्यासक्रम माहित नसून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपुस्तिका नाही."
2 "जीवन एक संघर्ष आहे."
3 "अंधारात बसण्यापेक्षा एक दिवा कधीही लावणे चांगलेच".
4 "सर्वाना खुश करण्याचा प्रयत्नात तुम्ही कोणालाही खुश करू शकणार नाही. इतरांच्या आनंदासाठी स्वतःचे आयुष्य जगणे अवघड होते."
5 "संवेदनशील लोकांना वास्तविक जग समजण्यासाठी वेळ अधिक लागतो."
6 "पैसा अशी गोष्ट आहे जी क्वचितच एकत्र होते आणि झाल्यास बहुधा लोकांना विभक्त करते."
7 "कधीही संवेदनशील होऊ नका. असे लोक आयुष्यात खूप त्रास देतात."
8 "आम्ही आमच्या मुलांना जीवनात दोनच गोष्टी देऊ शकतो ज्या आवश्यक आहे. मजबूत मूळ आणि शक्तिशाली पंख. त्याच्याने ते उंच भरारी घेऊ शकतात आणि
स्वतंत्ररित्या आयुष्य जगू शकतात."
9 "आयुष्यातील अनुभवाने सांगायचे की यश, पद, पुरस्कार, पैश्यांपेक्षा चांगले संबंध आणि मानसिक शांती असणे खूप महत्वाचे आहे."
10 "जेव्हा एखाद्याची फसवणूक होते तेव्हा तो सर्व गमावून बसल्यामुळे नाही तर एखाद्याला फसवणे सहज असते ह्यासाठी नाराज होतो".
11 "मुली मोठ्या झाल्यावर आईच्या चांगल्या मैत्रिणी होतात पण जेव्हा मुलं मोठे होतात त्यावेळी ते अनोळखी बनतात."
12 "एका आगीला दुसऱ्या आगीने विझवता येत नाही हे कार्य फक्त पाणीच करू शकतो."
13 "आयुष्यात सर्व अडचणी आणि अपयशाला निमूटपणे सामोरी जावे."
14 "प्रामाणिकपणा हे कुठल्या विशिष्ठ वर्गासाठी नाही, कुठल्याही शाळेत शिकवलं जात नाही, प्रामाणिक पणा हा नैसर्गिकच असतो आणि नैसर्गिकरित्या मनात उमलत असतो."