Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात लागू

Webdunia
शनिवार, 25 जून 2022 (08:57 IST)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात सरासरी ७० टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत तलावांत १,४१,३८७ दशलक्ष लिटर इतका कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने व अपेक्षित पाऊस न पडल्याने अखेर पालिकेने २७ जूनपासून दररोजच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महापालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही १० टक्के कपात लागू राहणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना दररोज ३,८५० ऐवजी ३,४६५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होणार आहे. तलावातील शिल्लक पाणीसाठा व दररोज होणारा पाणीपुरवठा यांचे गणित केल्यास मुंबईला पुढील ४० दिवस म्हणजे येत्या २ ऑगस्टपर्यन्त पुरेल इतका आहे. मुंबईकरांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
 
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मुंबईतील कमी क्षमतेच्या दोन तलावांत व मुंबई बाहेरील पाच मोठया तलावांत म्हणजे एकूण सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. पावसाळा संपल्यावर म्हणजे १ ऑक्टोबर रोजी पालिकेकडून तलावातील पाणी साठ्याचा आढावा घेतला जातो. त्यानुसार मुंबईला पुढील वर्षभरासाठी सात तलावांत मिळून १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असणे आवश्यक असते. मात्र तलावांत अपेक्षित पाणीसाठा नसेल व तो खूप कमी असेल तर पालिका प्रशासन पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेते.

संबंधित माहिती

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

पुढील लेख
Show comments