Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

थोडे थोडके नाही तर ४५ लाखांचे मोबाईल पोलीसानी केले हस्तगत, टोळी गजाआड

Webdunia
बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (09:32 IST)
मुंबई यथील खारघरमधील शिव इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल शोरुमचे शटर गॅस कटरने कट करुन सुमारे 50 लाख रुपये किमतीच्या वस्तूंची चोरी करण्यात आलेली होती. या प्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखेने तीन आरोपींसह पोलिसांनी 45 लाख रुपयांचा चोरी केलेला ऐवज हस्तगत केलेला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी आयुक्तालयात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलेली आहे. खारघर येथील शिव इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल शोरुमचे शटर गॅस कटरने कट करुन सुमारे 50 लाख किमतीच्या वस्तूंची चोरी करण्यात आलेली होती.
 
यामध्ये महागडे मोबाईल, लॅपटॉप, रोख रकमेचा समावेश होता. गुन्हेगारांनी अतिशय नियोजनरीत्या गुन्हा करत ओळख पटू नये यासाठी शोरुममधील डी.व्ही.आर काढून टाकला होता. त्यानंतर संबंधित मोबाईलचे शोरुम फोडून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करुन नेले. या गुन्ह्याचा समांतर तपास चालू असताना गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांना या गुन्ह्यातील आरोपींबाबत खात्रीशीर माहिती मिळाली.
 
त्यानुसार, मध्यवर्ती कक्षाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांनी धारावीतून शफिकउल्ला उर्फ सोनु अतिकउल्ला ( वय 24 वर्षे), अयान उर्फ निसार उर्फ बिटु रफी अहमद शेख (वय 28 वर्षे) आणि नालासोपारा येथून इम्रान मोहमद उर्फ इम्मु बिंदु अन्सारी (वय 25 वर्षे) या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांना सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

Mahakumbh Stampede : अपघाताची न्यायालयीन चौकशी होणार,पीडितांना 25 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार

केंद्र सरकारने महाराष्ट्रातून 9 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

बांगलादेशात रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप, गाड्यांची चाके ठप्प, माल वाहतुकीवर परिणाम

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने राष्ट्रीय खेळांमधील खेळाडूंच्या सुरक्षेसाठी सक्षम, हेल्पलाइन सुरू केली

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपींचा मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुढील लेख
Show comments