Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत अंशत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल

Webdunia
सोमवार, 8 मार्च 2021 (15:53 IST)
मुंबईत रविवारी १,३६१ नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत. गेल्या १३१ दिवसांतील मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा हा सर्वाधिक आकडा आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शहरात कोरोनाचा उद्रेक आटोक्यात न आल्यास लवकरच मुंबईत अंशत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत दिले आहेत.  
 
राज्यात रविवारी एका दिवसात तब्बल ११ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. रविवारचा रुग्णसंख्येचा आकडा गेल्या १४१ दिवसांमध्ये सर्वाधिक आकडा ठरला आहे. 
 
सार्वजनिक आरोग्य विभागानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरोना रुग्ण वाढीची माहिती बैठकीत सादर केली असून वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. सप्टेंबर महिन्यापेक्षाही आता अधिक रुग्ण वाढत असल्याची माहिती देण्यात आली. त्यासोबतच अंशत: लॉकडाऊन बाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

नागपूर : एका कुख्यात गुन्हेगाराची त्याच्याच साथीदारांनी केली निर्घृण हत्या

चंद्रपूर : कर न भरणाऱ्यांची मालमत्ता जप्त केली जाईल, नळ कनेक्शन देखील कापले जातील

३.५ बीएचके फ्लॅटमध्ये ३०० मांजरी ठेवल्या, सोसायटीतील लोकांनी गोंधळ घातल्यावर कारवाई

नागपूरमध्ये भीषण अपघातात आजी आणि नातवाचा मृत्यू, ४ जण जखमी

मुख्य निवडणूक आयुक्तांबाबत पंतप्रधान कार्यालयात झाली बैठक, राहुल गांधीची उपस्थित, काँग्रेसने दिली ही सूचना

पुढील लेख
Show comments