Dharma Sangrah

अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले

Webdunia
बुधवार, 25 सप्टेंबर 2024 (17:12 IST)
बदलापुरातील बलात्कार प्रकरणाचा अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार झाला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडली ती गोळी त्याच्या डोक्यात लागली आणि त्याचा मृत्यू झाला. या एन्काऊंटरवर विरोधक चांगलेच संतापले असून राज्य सरकार वर ताशेरे युद्धात आहे. एन्काऊंटरवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

बदलापूर चकमकी बाबत राज्यात सातत्याने वाद सुरु आहे. वरळीचे आमदार आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बदलापूर लैंगिक अत्याचारात मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, एका आपटेला वाचविण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या करण्यात आली. ही चकमक होती की हत्या की आत्महत्या असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

लैंगिक छळाबाबत ते म्हणाले, शिंदे सरकार अपयशी ठरले आहे. हे शिंदे यांच्या प्रशासनाचे पूर्णपणे अपयश आहे. पीडितेच्या आईला एफआयआर दाखल कण्यासाठी वारंवार पोलीस ठाण्यात जावे लागले असे त्यांनी अधोरेखित केले आहे. 

या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आहे तर ट्रस्टी आणि सचिव तुषार आपटे आहे.काही काळापूर्वी सोशल मीडियावर एक बॅनर व्हायरल झाला होता या बॅनर मध्ये तुषार आपटेचा फोटो असून त्यांना अंबरनाथ जिल्ह्यातील जनकल्याण समितीचे अध्यक्ष संगितले होते. 

लैंगिक छळ  प्रकरणात बदलापूर शाळेचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्या विरुद्ध प्रकरणाचे सह आरोपी म्हणून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: शिक्षण कर्मचाऱ्यांनी ८ डिसेंबरपासून तीव्र आंदोलनाची घोषणा केली

बीएमसीने मुंबईकरांसाठी ५ ते ७ डिसेंबरपर्यंत भरती-ओहोटीचा इशारा जारी केला

मोहम्मद शमीने निवडकर्त्यांना त्याच्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर दिले, SMAT २०२५ सामन्यात धुमाकूळ घातला

निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यात खळबळ उडाली; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "सरकारचा कोणताही सहभाग नाही"

पुण्याच्या नवले पूल दुर्घटनेचा मुद्दा सुप्रिया सुळेंनी संसदेत उपस्थित केला, नितीन गडकरींनी दिले उत्तर

पुढील लेख
Show comments