Marathi Biodata Maker

आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यामुळे काळजी वाढली

Webdunia
बुधवार, 29 डिसेंबर 2021 (17:22 IST)
देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईमध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याबाबत दिल्लीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत, तर मुंबईतही अनेक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.
 
दरम्यान, बुधवारी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत (DDMA) बैठक घेतली. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उपस्थित होते.
 
दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी भीती व्यक्त केली आहे की मुंबईत कोरोना संसर्गाची दररोजची प्रकरणे 2000 च्या पुढे जाऊ शकतात. ते म्हणाले, "गेल्या आठवड्यात दररोज 150 केसेस येत होत्या. आता सुमारे दोन हजार केसेसची नोंद होत आहे. मुंबई आज दररोज दोन हजार केसेस ओलांडू शकते."
ALSO READ: मुंबईतील कोरोनाची परिस्थिती काय?
दरम्यान महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यामध्ये टोपे म्हणाले, "अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या आज (29 डिसेंबर) 2000 च्या पुढे येण्याची शक्यता आहे. मुंबईचा पॅाझिटिव्हीटी रेट 4 टक्के येऊ शकतो. हे अजिबात चांगलं नाही. आपल्याला काळजी घ्यावी लागेल. काळजी घेतली नाही तर किंमत चुकवावी लागेल. निर्बंध वाढवण्याची गरज निर्माण होऊ शकेल. मुख्यमंत्री आणि आरोग्यविभाग याबाबत निर्णय घेतील. परिस्थिती पहाता निर्बंधाबाबत आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments