Marathi Biodata Maker

अनैतिक संबधातून बारबालेचा खून !

Webdunia
सोमवार, 22 मार्च 2021 (16:03 IST)
मुंबईच्या डोंबिवलीत अनैतिक संबधातून बारबालेचा गळा दाबून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईल सीडीआरद्वारे हत्येचा उलगडा करत पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरती अरूण सकपाळ (वय 47, रा. डोंबिवली) असे खून झालेल्या बारबालेचे नाव आहे. तर श्रीनिवास बसवा मडीवाल (वय 34, रा. रूचिरा बार, कल्याण, मूळगावः रा. थोमबाटू, जिल्हा : उडपी, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथे राहणा-या आरती सपकाळ हीचा शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरात साडीने गळा आवळून खून झाला होता. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली सुरु होता. दरम्यान मयत आरती काम करत असलेल्या कल्याणच्या रूचिरा बार येथे काम करणारा श्रीनिवास मडीवाल याच्यावर पोलिसांची संशयाची सुई स्थिरावली. आरतीच्या मोबाईलचा सीडीआर तपासला. त्यात तिच्यासोबत बारमध्ये करणारा तिचा सहकारी श्रीनिवास मडीवाल याच्याशी दररोज बोलणे होत असल्याचे उघडकीस आले. आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून त्याला कल्याण स्टेशनच्या पुलावरून ताब्यात घेतले. अशाप्रकारे आरतीच्या खुन्याच्या गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांच्या आत मुसक्या आवळल्या. आर्थिक आणि अनैतिक संबंधातून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. विष्णूनगर पोलिस तपास करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments