Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजपासून मुंबई पालिकेच्या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी प्रशासकावर

Webdunia
मंगळवार, 8 मार्च 2022 (07:45 IST)
१४ व्या मुंबई महापालिकेची मुदत  ७ मार्च रोजी संपुष्टात आली. त्यामुळे आता सर्वपक्षीय २२७ नगरसेवक व ५ नामनिर्देशित नगरसेवक यांचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पालिकेने राहण्यासाठी दिलेला राणीच्या बागेतील बांगला खाली करून द्यावा लागणार आहे. पालिकेने विविध समिती अध्यक्षांना वापरासाठी दिलेल्या गाड्या पालिका गॅरेजमध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे आता आजपासून म्हणजे ८ मार्च रोजीपासून पालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. पालिकेच्या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी ही प्रशासक म्हणून पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या खांद्यावर येणार आहे. पालिकेशी संबंधित महत्वाचे धोरणात्मक निर्णय तेच घेतील.
 
मुंबई महापालिकेच्या इतिहासात पालिकेवर प्रथमतः १ एप्रिल १९८४ ते २५ एप्रिल १९८५ या कालावधीसाठी प्रशासक नेमण्यात आली} होता. या घटनेला आज ३८ वर्षे होत आली. एवढया वर्षांनी आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. मात्र अद्यापही त्याबाबत राज्य सरकारकडून पालिकेला साधे एखादे पत्रकही आलेले नसल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच, १९९० ते १९९२ या कालावधीत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पालिकेचा कार्यकाल वाढविण्यात आलेला होता. यावेळीही पालिकेवर प्रशासक न नेमता पालिकेचा कार्यकाळ वाढविण्यात यावा, अशी मागणी पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुकमा येथे सुरक्षा दलाच्या ट्रकवर IED स्फोटात दोन जवान शहीद

टॅक्सी आणि रिक्षाचालकां जीवन विमा संरक्षण मिळणार मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केली

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय आश्चर्यकारक नाही, कारण...

Pune Bus Accident:पुण्यात प्रवाशांनी भरलेली बस झाडावर आदळून अपघात, 22 प्रवासी जखमी

NEET पेपर लीक प्रकरणात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अटक

सर्व पहा

नवीन

शिकाऊ कार चालकाच्या चुकीने एका महिलेचा मृत्यू , घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

NEET PG परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

पूल दुर्घटना, पूर्व चंपारणमध्ये बांधकामाधीन पुलाचा काही भाग कोसळला

NEET-UG Scam : नीट हेराफेरी प्रकरणात सीबीआय ने FIR नोंदवला

Chardham Yatra: बद्रीनाथ आणि यमुनोत्रीमध्ये चार यात्रेकरूंचा मृत्यू,मृतांची संख्या 150 च्या पुढे

पुढील लेख
Show comments