Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत साथीच्या आजाराचे रुग्ण घटले

मुंबईत साथीच्या आजाराचे रुग्ण घटले
Webdunia
मंगळवार, 14 जून 2022 (21:47 IST)
साथीच्या आजाराचे रुग्ण घटले असून मृत्यू रोखण्यासही मुंबई पालिकेला यश आले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जून महिन्याच्या मध्यपर्यंत एकाही साथीच्या आजाराचा रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
 
पालिका आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या एका वर्षात मलेरिया ५००७ रुग्ण सापडले होते त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. लेप्टोच्या २४० रुग्णांपैकी ८ मृत झाले. डेंग्यूच्या १२९ रुग्णांपैकी ३ मृत झाले. कावीळच्या २६३ रुग्ण सापडले. तर चिकूनगुणीयाचा एकही रुग्ण सापडला नाही. स्वाईन फ्ल्यूचे ४४ रुग्ण, गॅस्ट्रोचे २५४९ रुग्ण सापडले होते.
 
दिलेल्या आकडेवारीनुसार २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये १ हजार ६०२ रुग्णांची वाढ झाली तर मृत रुग्णांच्या संख्येत एकाने वाढ झाली. तसेच, २०२२ मधील जूनपर्यंतच्या आकडेवारीची तुलना मागील दोन वर्षातील साथीच्या आजारांनी त्रस्त रुग्णांशी व मृत रुग्ण संख्येशी केल्यास सन २०२० च्या तुलनेत यंदा रुग्ण संख्या ४,३०१ ने कमी आहे. तसेच, सन २०२१ च्या तुलनेत यंदा रुग्ण संख्या ५,८०३ ने कमी आहे. तर गेल्या दोन वर्षात मिळून एकूण २५ रुग्णांचा साथीच्या आजारांमुळे मृत्यू झालेला आहे. तर यंदाच्या वर्षी १ जानेवारी ते १२ जूनपर्यंतच्या कालावधीत साथीच्या आजारांमुळे अद्याप एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, खार पोलिसांनी समन्स बजावले; या दिवशी उपस्थित राहावे लागेल

LIVE: 'सौगत-ए-मोदी' नाहीये हे सत्ता जिहाद आहे उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

'त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या, त्याला प्रसाद द्यायला हवा', कुणाल कामराच्या नवीन व्हिडिओवर मंत्री शंभूराज संतापले

मांजरीला घाबरून पळाली उकळत्या दुधाच्या भांड्यात पडली, चिमुरडीचा वेदनादायक मृत्यू

संविधान कोणीही बदलू शकत नाही... महात्मा गांधींचा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 'राम राज्य'वर काय म्हटले?

पुढील लेख
Show comments