Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आज रात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा बंद – मुख्यमंत्री

आज रात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा बंद – मुख्यमंत्री
Webdunia
मंगळवार, 24 मार्च 2020 (20:02 IST)
आज रात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. केंद्र सरकारला आधीच यासंदभार्तील परवानगीच पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर यावर अंमलबजावणी करण्यात आली असून आज मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा बंद केली जाणार आहे. 
 
याआधी सरकारने राज्यात कलम १४४ आणि संचारबंदी लागू करत एसटी व खासगी बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तर आता देशांर्गत सेवाही बंद करण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच २२ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. देशात कोरोनाचा प्रसार हा अधिकतर परदेशातून आलेल्या लोकांमुळे झाल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना पुन्हा एकदा नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसंच राज्यावर आलेल्या या संकटाचा कोणी संधी म्हणून उपयोग करू नये. मास्काचा काळाबाजार होता कामा नये, अशी सूचनाही त्यांनी केली. तर सर्वांनी समजूतदारपणा दाखवावा, असं त्यांनी म्हटलं. यावेळी देशांतर्गत सेवा बंद केल्याने व विविध परताव्यांची अंतिम तारीख पुढे ढकलण्याच्या निर्णयावर मुखमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: हिंदूसाठी दिलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांना संजय निरुपम यांचे प्रत्युत्तर

नागपूर हिंसाचारात हिंदूसाठी दिलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांना संजय निरुपम यांचे प्रत्युत्तर

CSK vs MI Playing 11: फिरकी गोलंदाजांच्या बळावर सीएसके मुंबईला आव्हान देईल

जागतिक हवामान दिन कधी आणि का साजरा केला जातो, महत्त्व आणि थीम जाणून घ्या

KKR vs RCB: विराट कोहलीसाठी चाहता सुरक्षा घेरा तोडून मैदानात पोहोचला, मिठी मारली

पुढील लेख
Show comments