Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाणीसाठा कमी असल्याने मुंबईला जलसंकटाची चाहूल लागली

Webdunia
गुरूवार, 15 फेब्रुवारी 2024 (09:01 IST)
मुंबईची तहान भागवणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात यंदा मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० दिवसांचा पाणीसाठा कमी असल्याने मुंबईला जलसंकटाची चाहूल लागली आहे. एप्रिल-मे महिन्यात पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याने आणि  धरणातील सध्याची पाणीपातळी पाहता मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट अटळ असण्याची चिन्हे आहेत.
 
राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाकडे पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त पुरवठा करण्यासाठी विनंती करणार आहोत. मात्र, ती मान्य न झाल्यास आम्हाला काही काळासाठी पाणीकपात करावी लागल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
बदलत्या हवामानामुळे पाऊसही लहरी झाला आहे. त्यामुळे ७ जूनपासून बरसणारा पाऊस आता लांबणीवर पडत आहे. गेल्या वर्षी पावसाने धरण क्षेत्राकडे पाठ फिरवल्याने १ जुलै २०२३ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली होती. परंतु, धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसल्याने ८ ऑगस्टपासून पाणीकपात रद्द करण्यात आली होती.
 
२०२२ मध्येही १० टक्के पाणीकपात केली होती. मार्च, एप्रिल व मे महिना उन्हाळी असून, पाण्याच्या पातळीत घट होण्याची चिन्हे आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

LIVE: मला फक्त दोन तासांसाठी ईडीची कमान द्या,संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

लातूर मध्ये वेगवान एसयूव्ही हॉटेलात शिरली, एकाचा मृत्यू, चार जखमी

बेकायदेशीर कोळसा खाण कोसळल्याने पती-पत्नीचा वेदनादायक मृत्यू

पुढील लेख
Show comments