Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नीता अंबानींच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त 'अन्न-सेवा', देशभरात 1.4 लाख लोकांना जेवणाचे वाटप

Webdunia
गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (12:04 IST)
• नीता अंबानी यांनी त्यांचा वाढदिवस 3 हजार वंचित समाजातील मुलांसोबत साजरा केला.
नवी दिल्ली- रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी 1 नोव्हेंबर रोजी त्यांचा 60 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अन्न सेवेअंतर्गत 15 राज्यांतील 1.4 लाख लोकांना अन्नदान करण्यात आले. अन्न सेवेच्या माध्यमातून सुमारे 75 हजार लोकांना शिजवलेले जेवण देण्यात आले. तर सुमारे 65 हजार लोकांसाठी कच्च्या रेशनचे वाटप करण्यात आले.
 
लहान मुले, वृद्धाश्रमात राहणारे वृद्ध, रोजंदारीवर काम करणारे, ट्रान्सजेंडर समुदायातील लोक, कुष्ठरोगी आणि विशेष गरजा असलेल्या लोकांना जेवण देण्यात आले. अन्न वाटपापासून ते विविध ठिकाणी गरमागरम जेवण देण्यापर्यंतची सर्व कामे रिलायन्सच्या स्वयंसेवकांनी केली. नीता अंबानी यांनी वंचित समाजातील सुमारे 3000 मुलांसोबत वाढदिवस साजरा केला.
कोरोना महामारीच्या काळात नीता अंबानींच्या रिलायन्स फाऊंडेशनने अन्न सेवा नावाने त्यावेळचा सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम चालवला होता. फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार नीता अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त अन्न वाटप हा त्याच परंपरेचा विस्तार आहे.
 
नीता अंबानी यांनी शिक्षण, महिला सबलीकरण, क्रीडा, कला आणि संस्कृती या क्षेत्रांत अगणित कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाऊंडेशनने देशभरातील 7 कोटी 10 लाखांहून अधिक लोकांचे जीवन प्रभावित केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

गोमूत्र प्या आणि गरबा खेळा, भाजप नेत्याच्या वक्तव्यावरून गोंधळ

‘हवस के पुजारी का, मौलवी का नाही?’, मौलाना यांनी बागेश्वर बाबांचे विधान घृणास्पद म्हटले

एअर इंडिया एक्सप्रेस आणि एआयएक्स कनेक्टचे विलीनीकरण पूर्ण,डीजीसीए ने दिली मान्यता

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस केली

IND vs BAN: भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला मालिका जिंकली

पुढील लेख
Show comments