Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव देण्याची राज्य सरकारची घोषणा

Webdunia
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (10:06 IST)
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली आहे. जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्य सरकार ने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी रतन टाटा यांच्या नावाने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली असून पुढील वर्षांपासून हा पुरस्कार दिला जाणार आहे.

तसेच मुंबईतील नरिमन पॉईंट येथे मोठं उद्योगभवन उभारण्यात येणार असून या उद्योग भवनाला रतन टाटा यांचे नाव दिले जाणार अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. जेणे करून त्यांचे काम व स्मृती लोकांच्या लक्षात कायमस्वरूपी राहील. 
 
रतन टाटा यांना भारतरत्न मिळावे या साठी सर्वत्र मागणी केली जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात रतन टाटांचे नाव भारतरत्न पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्याचा निर्णय घेतला.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात आता रतन टाटांच्या नावावर उद्योगरत्न पुरस्कार, राज्य शासनाचा निर्णय

मनू भाकरचे वैयक्तिक प्रशिक्षक राणा यांनी पीटी उषाचा IOA टीकेविरुद्ध बचाव केला

Israel: गाझा शाळेवर इस्रायलच्या हल्ल्यात 28 ठार

Ranji Trophy: रणजी करंडक स्पर्धेचा पहिला टप्पा शुक्रवारपासून सुरू होणार

रतन टाटा पंचतत्त्वात विलीन, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

पुढील लेख
Show comments