Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल

Webdunia
सोमवार, 8 मार्च 2021 (07:32 IST)
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झालाय. एटीएसनं हा गुन्हा दाखल केला. मनसुख यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी केली होती. त्यानंतर एटीएसनं हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएसनं सगळी कागदपत्रं मुंब्रा पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेतलीयत आणि पुढचा तपास सुरू केला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांच्या शरीरावर जखमा आढळल्या नाहीत. त्यांच्या मृतदेह जवळपास 10 तास पाण्यात असल्याची शक्यता शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होत आहे.  पण या खुणा कधीच्या आहेत, हे मात्र कळू शकलेलं नाही. मनसुख यांच्या चेहऱ्याच्या नागपुडीजवळ दीड सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरती लाल खूण आहे. चेह-याच्या उजव्या बाजूकडील गालावर ८ सेंटीमीटर बाय ३ सेंटीमीटर एवढी मोठी गडद लाल रंगाची खूण आहे. इतकंच नाही तर उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खूण आहे.
 
मनसुख हिरेन यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कोणताही घातपात नसल्याचा उल्लेख तसंच शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याची माहिती समोर आलेली. मात्र आता विस्तृत अहवालानुसार शरीरावर काही खुणा असल्याचं उघडकीस आलं आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments