Marathi Biodata Maker

मुंबईचा डबेवाला कामगार पाच दिवसांच्या सुट्टीवर चालला

Webdunia
सोमवार, 11 एप्रिल 2022 (07:43 IST)
मुंबईच्या चाकरमान्यांना वेळेवर डबा पोहचवणारा मुंबईचा डबेवाला कामगार पाच दिवसांच्या सुट्टीवर चालला आहे. 13 एप्रिल वार बुधवार ते 17 एप्रिल वार रविवार पर्यंत डबेवाला कामगार सुट्टीवर चालला आहे. ग्रामदैवत, कुलदैवताच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी डबेवाले आपल्या मुळ गावी जाणार आहे.
 
मुंबईचा डबेवाला कामगार हा पुणे जिल्हयातील प्रामुख्याने खेड ( राजगुरूनगर ) मावळ, या तालुक्यांतून व काही अंशी मुळशी,आंबेगाव, जुन्नर, या तालुक्यांतून मुंबईत येतात. या तालुक्यांतील गावो गावच्या यात्रेचा हंगाम चालू झाला आहे. गेली दोन वर्ष करोनामुळे गावो गावच्या यात्रा बंद होत्या. या यात्रेत सहभागी होण्यासाठी व बैलगाडा शर्यत पहाण्यासाठी डबेवाला कामगार उत्सुक आहे. यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच कुळाचाराचे सोपस्कार पार पाडण्यासाठी डबेवाला कामगार आपल्या गावाला जातात. त्यामुळे पाच दिवस त्यांची सेवा बंद राहणार आहे.
 
या पाच दिवसाच्या सुट्टीच्या कालावधीत दोन शासकीय सुट्या येत आहेत व शनिवार रविवार येत आहे. त्या मुळे बहुतांश आस्थापना मधिल डबे बंद आहेत व परीक्षा कालावधी असल्या मुळे कॅान्हेंन्ट शाळेचे डबे बंदच आहेत, काही कार्यालयांना रजा आहे त्या मुळे डबेवाल्यांच्या सुट्टीचा ग्राहकांना जास्त त्रास होणार नाही. तरी ही काही ग्राहकांची गैरसोय होणार आहे त्या बद्दल डबेवाला कामगार दिलगीरी व्यक्त करीत आहे. तसेच या सुट्टीचा डबेवाला कामगार यांचा पगार ग्राहकाने कापू नये, असे आवाहन “मुंबई डबेवाला असोशिएशन” ने ग्राहकांना केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments