Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई जगातील 7 व्या क्रमांकाचे प्रदूषित शहर; जाणून घ्या टॉप 6 शहरांची नावे

Webdunia
सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (08:36 IST)
मुंबई : दिवाळीतील रासायनिक फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील प्रदूषणात (Mumbai Pollution) मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील प्रदूषण चिंताजनक स्तरावर पोहचले आहे. जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार (Global air quality index) शुक्रवारी (दि.5) मुंबई जगातील 7 वे प्रदूषित शहर ठरले आहे. लक्ष्मी पुजनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 169 नोंदवला गेला आहे. त्यानुसार मुंबई शहर (Mumbai City) हे जगातील 7 व्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे.
 
पहिल्या क्रमांकावर 426 हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार दिल्ली शहर (Delhi City) आहे. दिल्ली शहर सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. कोलकाता (Kolkata) शहराचा देखील प्रदूषित शहरांच्या यादीत समावेश आहे. गुरुवारी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक हा मध्यम म्हणजे 162 नोंदवला गेला. तर कुलाबा 290 आणि बीकेसी 290 हवेचा स्तर वाईट नोंदवला गेला होता. नवी मुंबई हवा गुणवत्ता निर्देशांक 118, अंधेरी 135, बोरिवली 142, चेंबूर 162 सह मध्यम तर वरळी येथे हाच निर्देशांक 95 सह समाधान कारक नोंदवला गेला. मात्र मुंबईत शनिवारी पुन्हा एकदा प्रदूषणाची (Global Air Quality Index) पातळी वाढली आहे.
 
जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांक (5 नोव्हेंबर)
 
मुख्य शहर          देश                  एक्यूआय (AQI)
 
दिल्ली                भारत                 426
लाहोर                 पाकिस्तान         246
बीजिंग                चायना               212
बुशकेक               कर्गिस्तान         188
कराची                 पाकिस्तान        182
शिन्यांग              चायना               171
मुंबई                    भारत                169

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments