Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने, कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार पार

Webdunia
बुधवार, 5 जानेवारी 2022 (21:19 IST)
मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे.  महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी २० हजारांहून दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्यावर मुंबईत लॉकडाऊन लावला जाईल असा इशारा दिला होता. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील रुग्णसंख्या वाढली तर मुंबईत लॉकडाऊन लावला जाईल, असा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार पार गेली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १५ हजार १६६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ३३ हजार ६२८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३८४ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ५२ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ६१ हजार ९२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
मुंबईत बुधवारी कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.  आढळलेल्या १५ हजार १६६ रुग्णांपैकी १३ हजार १९५ रुग्ण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत आज दिवसभरात ६० हजार १४ कोरोना चाचण्या झाल्या आहे असून आतापर्यंत १ कोटी ३९ लाख २४ हजार ६०८ चाचण्या झाल्या आहेत. आज दगावलेल्या रुग्णांपैकी २ जणांचा दीर्घकालीन आजार होते. १ रुग्ण पुरुष आणि दोन रुग्ण महिला होत्या. या मृत्यू झालेल्या रुग्णांचे वय ४० ते ६० वर्षांवर होते.
 
महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईतील रिकव्हरी रेट ९० टक्के असून मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर ८९ दिवस आहे. मुंबईत सीलबंद करण्यात आलेल्या इमारतींची संख्या ४६२ झाली आहे. मुंबईत काल, मंगळवारी १० हजार ८६० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली होती आणि २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

मोदी सरकारचा प्रत्येक अर्थसंकल्प म्हणजे निवडणूक पॅकेज… संजय राऊत यांनी टोला लगावला

मुंबई विमानतळावर अपघातात परदेशी प्रवाशासह 5 जण जखमी

गुजरातमध्ये भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू

नाशिक पोलिसांनी छापा टाकून 5 देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले

LIVE: देशातील पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रात बांधले जाणार

पुढील लेख
Show comments