Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने, कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार पार

Webdunia
बुधवार, 5 जानेवारी 2022 (21:19 IST)
मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे.  महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी २० हजारांहून दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्यावर मुंबईत लॉकडाऊन लावला जाईल असा इशारा दिला होता. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील रुग्णसंख्या वाढली तर मुंबईत लॉकडाऊन लावला जाईल, असा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार पार गेली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १५ हजार १६६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ३३ हजार ६२८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३८४ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ५२ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ६१ हजार ९२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
मुंबईत बुधवारी कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.  आढळलेल्या १५ हजार १६६ रुग्णांपैकी १३ हजार १९५ रुग्ण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत आज दिवसभरात ६० हजार १४ कोरोना चाचण्या झाल्या आहे असून आतापर्यंत १ कोटी ३९ लाख २४ हजार ६०८ चाचण्या झाल्या आहेत. आज दगावलेल्या रुग्णांपैकी २ जणांचा दीर्घकालीन आजार होते. १ रुग्ण पुरुष आणि दोन रुग्ण महिला होत्या. या मृत्यू झालेल्या रुग्णांचे वय ४० ते ६० वर्षांवर होते.
 
महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईतील रिकव्हरी रेट ९० टक्के असून मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर ८९ दिवस आहे. मुंबईत सीलबंद करण्यात आलेल्या इमारतींची संख्या ४६२ झाली आहे. मुंबईत काल, मंगळवारी १० हजार ८६० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली होती आणि २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments