suvichar

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला

Webdunia
गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (08:07 IST)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. पण कोर्टाच्या या निर्णयाविरोधात मलिक आता हायकोर्टात धाव घेणार आहे. दरम्यान, मलिकांचा जामीन फेटाळण्यात आला असला तरी त्यांची तुरुंगात रवानगी होणार नाही, त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु राहणार आहेत.
 
अधिक माहितीनुसार, वैद्यकीय कारणासाठी नवाब मलिक यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. तसेच ईडीच्या तपासावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. कोर्टाने सांगितले आहे की, प्राथमिकदृष्ट्या याप्रकरणी तपास यंत्रणांनी जे पुरावे गोळा केले होते, त्यानुसार त्यांच्यावरील आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांना जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर या प्रकरणी काही महिने सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने आज निकाल दिला आहे.
 
नवाब मलिकांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. त्यामुळे पुढील निर्देश येईपर्यंत त्यांच्यावरील उपचार सुरुच राहणार आहेत. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटळण्यात आला असला तरी त्यांची रवानगी लगेच तुरुंगामध्ये होणार नसून ते रुग्णालयातच उपचार घेणार आहेत. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात आता तातडीने हायकोर्टात धाव घेणार असल्याचे मलिकांच्या वकिलांनी सांगितले आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments