Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने राज्यपालांच्या कार्यक्रमात वीज पुरवठा खंडित

Webdunia
मंगळवार, 26 एप्रिल 2022 (11:44 IST)
महावितरण वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने आज सकाळी अंबरनाथ बदलापूर, ठाणे शहरात आणि मुंबईतील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. याचा प्रभाव राज्यपालांच्या कार्यक्रमावर देखील झाला. या दरम्यान मुंबईतील शिवाजी पार्क येथे स्काऊट गाईड राज्य पुरस्कार सोहळा समारंभात वीज पुरवठा खंडित झाला. आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास स्काऊट गाईड पुरस्कार वितरण सोहळा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाला. मात्र या कार्यक्रमाच्या सुरु होण्यापूर्वीच वीज पुरवठा खंडित झाला.
 
उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे डोंबिवली, कल्याणचा काही भाग, अंबरनाथ, बदलापूर भागात वीज पुरवठा खंडित झाला. महावितरण विभागाचे अधिकारी वीज पुरवठा लवकरच सुरळीत व्हावा या कडे लक्ष देत आहे. त्यासाठी महापारेषण विभागाकडून उपकेंद्र सुधारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. काही भागात वीज पुरवठा सुरळीत सुरू झाल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी दिली आहे. साधारणतः अर्धा ते पाऊण तासात वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments