Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत पावसाचा 'रेड' अलर्ट घोषित, अनेक जिल्ह्यांतील शाळा-कॉलेज बंद

Webdunia
गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (08:53 IST)
महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच हवामान विभागाने आज मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट घोषित केला आहे, तसेच ठाणे आणि नाशिकमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.   
 
पावसामुळे मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा, महाविद्यालये आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. गरज असेल तेव्हाच लोकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
 
मुंबई मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली असून लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अनेक भागांतून रस्त्यावर आणि घरांमध्ये पाणी साचल्याच्या बातम्या येत आहेत. लोकांना घरातून जीवनावश्यक वस्तू काढून सुरक्षित स्थळी नेण्यास भाग पाडले आहे. कुर्ला पूर्व ते गोरेगावपर्यंत अनेक भागात पाणी साचण्याची स्थिती गंभीर झाली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार हवामान विभागाने आज मुंबईत मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' घोषित केला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बुधवारी पाणी साचल्याने काही काळ लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता. मुंबई पोलिसांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले असून केवळ अत्यावश्यक कामांसाठी बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Sarvapitri Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्या बद्दल 10 न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या

शारदीय नवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

गजलक्ष्मी व्रत कथा वाचा, घरात लक्ष्मी नांदेल, सुख-संपत्ती, पुत्र-पोत्रादी आणि कुटुंब सुखी राहील

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : 3 की 4 ऑक्टोबर, शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे, घटस्थापनेची शुभ वेळ जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांना झेड श्रेणीची पोलिस सुरक्षा

महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये लाडकी योजना बंद होणार नाही- पृथ्वीराज चव्हाण

बदलापुरा...फडणवीस हातात रिव्हॉल्व्हरचे पोस्टर मुंबईत झळकले, उद्धव ठाकरे गटाकडून सडकून टीका

भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांचे लाडकी बहीण योजनेवर वादग्रस्त विधान, विजय वडेट्टीवार यांची टीका

पॅरासिटामॉलसह 53 औषधे गुणवत्ता चाचणीत नापास! व्हिटॅमिनच्या गोळ्याही धोकादायक

पुढील लेख
Show comments