Festival Posters

मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध; नवीन नियमावली

Webdunia
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (15:21 IST)
मुंबई : राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून ३१ डिसेंबरच्या म्हणजे आज मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लागू होणार आहे.
 
राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळ्यांना फक्त ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी दिली आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी दिली आहे. पर्यटनस्थळावर कलम १४४ लागू होणार आहे. तसेच परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.
 
राज्यात गुरुवारी १९८ नव्या ऑमिक्रॉनबाधितांची नोंद झाली. चिंतेची बाब म्हणजे यातील १९० रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर ४ रुग्ण हे ठाण्यातील आहे. राज्यात एकूण ऑमिक्रॉनबाधितांची संख्या ४५०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२५ रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. तसेच राज्यात गुरुवारी ५ हजार ३६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि २२ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे राज्यातील रुग्णसंख्येत वाढ होत गेली तर राज्यात आणखीन कडक निर्बंध लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
 
राज्य सरकारची नवीन नियमावली
– लग्न सोहळा बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मैदानात असो फक्त ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
– सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम किंवा मेळाव्या देखील बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मैदानात असो जास्तीत जास्त ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
– अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
– राज्याच्या कोणत्याही भागात जे पर्यटन स्थळे किंवा समुद्रकिनारे, मोकळी मैदाने जिथे गर्दी होण्याची शक्यता आहे तिथे स्थानिक प्रशासनाला १४४ लागू करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
– आधीच अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सूचनाही लागू राहतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील महिला आणि गर्भवती महिलांना आपोआप खालचा बर्थ मिळेल', अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले

ठाण्यातील घोडबंदर रोड प्रकल्प 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

LIVE: शिक्षकांनी टीईटीच्या आदेशाचा निषेध केला

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, पुणे-लोणावळा लोकलसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द

रतन टाटा यांच्या आई सिमोन टाटा यांचे निधन

पुढील लेख
Show comments