Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भीषण दुर्घटना : भिंवडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली

Webdunia
सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (08:29 IST)
ठाण्यातील भिंवडीमध्ये सोमवारी पहाटे तीन मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या भयंकर घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. पहाटे सगळे गाढ झोपेत असतानाच इमारत जमीनदोस्त झाली आहे.
 
भिंवडीतील पटेल कंपाऊंडमधील जिलानी अपार्टमेंट ही दुर्घटना घडली आहे. पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक इमारत कोसळली. त्यानंतर सर्वत्र आरडाओरड आणि धावपळ सुरू झाली. इमारत दुर्घटनेनंतर तातडीनं ठाणे महानगर पालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्य हाती घेतल्यानंतर २० नागरिकांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. सकाळी साडेसातपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
 
कोसळलेल्या जिलानी इमारतीच्या चारही बाजूंनी इतर इमारती असल्यामुळं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जवळपास ३५-४० जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, ही इमारत अत्यंत दाटीवाटीच्या भागात असल्यामुळं घटनास्थळी जेसीबी, डंपर थेट घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळं बचावकार्यात अडथळा येत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

कुणाल कामरा वाद प्रकरणात राहुल कनालसह ११ जणांना अटक, अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल

गद्दार ते गद्दारच, कुणालने काहीही चुकीचे बोलले नाही- उद्धव ठाकरेंचे विधान समोर आले

जर घरे पाडली तर आम्ही घरात घुसून मारहाण करू, नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नरेंद्र पाटील यांचा इशारा

LIVE: राहुल गांधी आणि कामरा दोघांनीही संविधान वाचलेले नाही, शिंदेंवरील टिप्पणीवर मुख्यमंत्री संतापले

'जर त्यांनी भाजपचा पर्दाफाश केला तर...', सुशांत प्रकरणात संजय राऊत म्हणाले- उद्धव यांनी नारायण राणेंना फोन केला नाही

पुढील लेख
Show comments