Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईच्या पाणीपुरठ्यातील 1 मार्चपासून लागू होणारी 10 टक्के कपात आता रद्द

Webdunia
शनिवार, 2 मार्च 2024 (07:57 IST)
राज्य शासनाने हमी दिल्यामुळे मुंबईच्या पाणीपुरठ्यातील 1 मार्चपासून लागू होणारी 10 टक्के कपात आता रद्द करण्यात आली आहे. शासन मुंबईसाठी मागणी केल्यानुसार जरी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करीत असेल तरी नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिका जल अभियंता खात्याचे प्रमुख पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे.
 
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावातील एकूण पाणीसाठा 45 टक्क्यांवर घसरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बाष्पीभवन, जलवाहिन्या फुटणे, गळती, पाणी चोरी आदींमुळे पाणीसाठा 5 टक्के कमी झाला आहे. त्यातच पावसाचा लहरीपणा पाहता मुंबई महापालिकेने नियमित पावसाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी दैनंदिन पाणी पुरवठ्यात 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी 1 मार्चपासून करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करण्याबाबत हमी देत विधिमंडळ अधिवेशनात मुंबईकरांवरील पाणी संकट टळल्याचे जाहीर केले. आता मुंबईवरील पाणी कपातीचे संकट टळले असून त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

पूजा खेडकरची IAS सेवा संपुष्टात,केंद्र सरकारची कारवाई

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये तीन मजली इमारत कोसळली,तिघांचा मृत्यू, 27 जणांना वाचवण्यात यश

WhatsApp: व्हॉट्सॲपच्या या युजर्सना मिळणार नवीन ॲप अपडेट

सिमरनने महिलांच्या 200 मीटरमध्ये उपांत्य फेरी गाठली

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक गाडले गेले

पुढील लेख
Show comments