Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढला

Webdunia
सोमवार, 17 मे 2021 (19:00 IST)
मुंबई आणि मुंबई पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढताना दिसून येत आहे. नवी मुंबई रात्रीपासून पाऊस पडत आहे. मात्र, सकाळी 8 वाजता जोर कमी झाला होता. त्यानंतर  9.15 वाजल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. तर पामबिच सानपाडा येथे विजेचा खांब अंगावर पडून  एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळामुळे मुंबईतील मोनो रेल्वे ची वाहतूक आज दिवसभरासाठी बंद करण्यात आली आहे.
 
दरम्यान, जोरदार वारे वाहतील, असा हवामान विभागाने पुन्हा इशारा दिला आहे. हे वारे ताशी 90-100 किमी प्रतितास वेगाच्या वाहतील. यावेळी जोरदार  वाऱ्यासह मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, पालघर, मुंबई, ठाणे व जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
 
मुंबईत दुपारी ३.४४ वाजता भरतीची वेळ आहे. त्यामुळे या कालावधीत पावसाचा जोर असाच कायम राहिल तर यंत्रणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या भरतीच्या कालावधीत सर्वात उंच लाट ही ३.९४ मीटर उंचीची असेल. तर ओहोटीची वेळ ९.४२ वाजता असणार आहे. ओहोटीच्या वेळेत लाटांची उंची २.१९ मीटर इतकी असेल.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments