Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी घट

number of corona patients
Webdunia
मंगळवार, 20 एप्रिल 2021 (21:38 IST)
मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी घट झाल्याचा दावा मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या एकुण ४७ हजार चाचण्यांपैकी ७ हजार मुंबईकरांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत सद्यस्थितीला ३६८५ बेड्स रिक्त असल्याचा दावाही आयुक्तांनी केला आहे. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये एकुण २१ हजार १६९ इतक्या बेड्सपैकी ३६८५ बेड्स रिक्त असल्याची आकडेवारी डॅशबोर्डच्या माध्यमातून आयुक्तांनी जाहीर केली आहे. तर मास्क न वापरणाऱ्या २६ लाख मुंबईकरांना दंड आकारण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीतही मृत्यूदर कमी असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. दिल्लीच्या तुलनेत मुंबई शहराचा मृत्यूदर हा ०.०३ टक्के म्हणजे दिवसाला सरासरी १३ मृत्यू इतका असल्याची आकडेवारी पालिका आयुक्तांनी जाहीर केली.
 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरूवात झाल्यापासून मुंबईत २ लाख ६६ हजार इतकी कोरोना रूग्णांची आकडेवारी आहे. तर मुंबईत गेल्या ७० दिवसांमध्ये ९५३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एकाच दिवशी २४० मृत्यू झाल्याची आकडेवारीही चहल यांनी स्पष्ट केली. मुंबईत झालेल्या ४५ हजार इतक्या चाचण्यांमध्ये ७ हजार ७२ जणांच्या चाचण्या पॉझिटीव्ह आल्या. गेल्या पाच दिवसात सातत्याने कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा आकडा हा १० हजारांच्या पुढे गेला होता. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत घट झाली आहे. मुंबईतल्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत ८७ टक्के नागरिक असिम्पटोमॅटिक असल्याचे समोर आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, अजित पवारांचा इशारा

औरंगजेबाच्या कबर वादात एनआयएची एन्ट्री,संभाजी नगरसह मराठवाड्यातील 9 शहरांवर कडक नजर

आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधले जाणार-देवेंद्र फडणवीस

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये,रमजानमध्ये अजित पवारांनी कोणाला इशारा दिला

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

पुढील लेख
Show comments