Dharma Sangrah

महामार्गावर बर्नींग बसचा थरार; काही मिनिटांत बस जळून खाक ;या बसमधून 52 प्रवासी प्रवास करीत होते

Webdunia
शुक्रवार, 13 मे 2022 (20:55 IST)
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंडीत एसटी महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला. आज मुंबई सेंट्रल येथून महाड येथील फौजी आंबवडे येथे जाणाऱ्या एमएच 14 बीटी 2056 क्रमांकाच्या एसटी बसला सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने बसमधील प्रवाश्यांची एकच तारांबळ उडाली. परंतु प्रसंगावधानामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
या बसमधून 52 प्रवासी प्रवास करीत होते. बसच्या समोरील बाजूकडून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने तात्कळ बस थांबवून प्रवाश्यांना बसमधून बाहेर काढले. आग इतकी भीषण होती की, या आगीत काही वेळेतच एसटी बस जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी अथवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रवाश्यांसह कंडक्टरचे सर्व सामान जाळून खाक झालेय.
 
या घटनेनंतर तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण करताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आग गंभीर स्वरूपाची असल्याने तब्बल तासाभराने अग्निशमन दलाला आग विझवण्यास यश आले. या अपघातामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments