Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत 1 जुलैपासून दैनंदिन पाणीपुरवठ्यात पाणीकपात

Webdunia
शनिवार, 1 जुलै 2023 (07:25 IST)
Water cut मुंबईत 1 जुलैपासून दैनंदिन पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणीकपात लागू करण्याची घोषणा केली आहे. परिणामी, उद्यापासून मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागेल.
 
जोपर्यंत तलावांत समाधानकारक पाऊस पडून पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ होत नाही तोपर्यंत ही पाणीकपात सुरूच राहणार आहे. तसेच, मुंबई महापालिकेकडून ठाणे, भिवंडी, निजामपूर या पालिका क्षेत्रातही काही प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने तेथेही सदर पाणीपुरवठयात 10 टक्के पाणीकपात लागू असणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना जोपर्यंत 10 टक्के पाणीकपात लागू राहील तोपर्यंत जपून पाणी वापर करावा लागणार आहे. मात्र पावसाने निराशाजनक कामगिरी केल्यास पाणीकपातीमध्ये पुढील काळात आणखीन वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
मुंबईत 24 जूनपासून पावसाला सुरुवात झाली. 28 जून रोजी तलावांत एकूण 1 लाख 5 हजार 109 दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला होता. सदर पाणीसाठा पुढील २७ दिवसच म्हणजे पुढील 24 जुलैपर्यंत पुरेल इतकाच होता. त्यातच मुंबई व ठाणे जिल्हा परिसरातही अपेक्षित पाऊस पडून तलावातील पाणीसाठ्यातही अपेक्षित वाढ होत नसल्याने पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, मुंबईत 1 जुलैपासून दैनंदिन पाणीपुरवठयात 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याची घोषणा 28 जून रोजी केली होती. मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. तर वर्षभरासाठी मुंबईला 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टीम इंडियाच्या स्वागतासाठी एका दिवसात, 2.2 किमी अंतराच्या रस्त्यावर परेड करणं योग्य होतं?

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

हाथरस दुर्घटना : अनेक बळी जाऊनही गुरुंबद्दल अनुयायी प्रश्न का उपस्थित करत नाहीत?

सुप्रिया सुळेंकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रशंसा, म्हणाल्या- बेरोजगारी आणि महागाई पाहता योजना चांगली आहे

सट्टेबाजी ऍप प्रकरणामध्ये छत्तीसगढ पोलिसांची मोठी कारवाई, महाराष्ट्र मधून 5 जणांना घेतले ताब्यात

सर्व पहा

नवीन

वृद्ध घरमालकाची घृणास्पद कृती, विद्यार्थिनींचा विनयभंग

चंद्रपुरात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळ्या झाडल्या, परिसरात खळबळ उडाली

मोदींनी करोडो लोकांना आळशी बनवले, मोफत धान्य देणे म्हणजे विकास नाही, ठाकरे गटाचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

कोटा मध्ये आत्महत्येचा आकडा 14, JEE ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

आसाम-मणिपुर मध्ये पुरामुळे हाहाकार, 56 जणांचा मृत्यू, 21 लाख लोक प्रभावित, शाळा-कॉलेज बंद

पुढील लेख
Show comments