Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करगिल विजयाला 15 वर्षे पूर्ण, शहिद जवानांना श्रद्धांजली

Webdunia
शनिवार, 26 जुलै 2014 (15:59 IST)
पाकिस्तानी सैन्याला माघारी पाठवून करगिलच्या उंच शिखरावर भारतीय जवानांनी आजच्या दिवशी    तिरंगा फडकवला होता. आज कारगिल विजय दिनाला 15 वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने द्रास आणि नवी दिल्लीत  शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्‍यात आली. देशाचे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्यासह तिन्ही दलाच्या प्रमुखांनी  इंडिया गेटवर अमर जवान ज्योतिवर करगिल युद्धात शहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 
 
1999 मध्ये भारताचा पारंपारिक शत्रु पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले होते. पाकिस्तानी जवानांना भारतीय  जवानांनी चोख प्रत्युत्तर देत अक्षरश: हाकलून लावले होते. भारतीय जवानांनी जीवाची बाजी लावत 26 जुलै,  1999 रोजी कारगिलच्या उंच शिखरावर तिरंगा फडकवत विजय मिळवला होता. यामुळे आजचा दिवस हा कारगिल दिन  म्हणून साजरा केला जातो. 
 
विजय दिवसाच्या निमित्ताने द्रास येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शहिद जवानांच्या  कुटुंबीयांना आमंत्रित करण्‍यात आले आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

Show comments