Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काश्मीर: 51 दिवसांनंतर संचारबंदी शिथिल

Webdunia
श्रीनगर- गेल्या 51 दिवसांपासून काश्मीर खोर्‍यात लागू असलेली संचारबंदी आज उठविण्यात आली आहे. श्रीनगर आणि पुलवामा येथील काही क्षेत्रात लोकांच्या एकत्र होण्यावर बंदी राहील. मात्र, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यासह श्रीनगरमधील एम. आर. गुंज आणि नोहट्टा पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत अद्याप संचारबंदी कायम आहे.
 
पोलिसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोर्‍याततील संचारबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
अनंतनाग जिल्ह्यात गेल्या आठ जुलैला हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहाण वणी याला ठार मारल्यानंतर संचारबंदी लागू झाली होती ज्यामुळे गेल्या 51 दिवसांपासून येथील लोकांचे जीवन प्रभावित झाले होते.
 
वणीला ठार मारल्यानंतर उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

पुढील लेख
Show comments