Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केजरीवाल यांनी चूक मान्य केली

Webdunia
शुक्रवार, 24 एप्रिल 2015 (17:49 IST)
नवी दिल्ली। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गजेंद्रच्या मृत्युबाबद म्हटले की मी माझी चूक मान्य करतो आणि अता सर्वांना आवाहन करतो की याविषयावरील चर्चा थांबवून शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर चर्चा करावी.

जंतरमंतर येथील आम आदमी पक्षाच्या रॅलीदरम्यान गजेंद्र नावाच्या एका शेतकर्‍याने आत्महत्या केली होती. त्यावर देशभर खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले की, व्यासपीठापासून झाड जवळ होते परंतु त्यावर बॅनर्स लावलेले असल्याने आम्हाला काही दिसत नव्हते. मात्र तिकडे काहीतरी गडबड चालू असल्याचे जाणवले. त्यावेळी तिथे काही स्वयंसेवक आणि पोलिस होते. पण कोणालाही तो आत्महत्या करेल असे वाटले नव्हते.

केजरीवाल यांनी हे मान्य केले की त्यावेळी मला बोलणे थांबवायला हवे होते. त्याबद्दल मी माफी मागतो. त्यांनी मीडियावर टीका करत म्हटले की गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या नाटकाने जर तुमचा टीआरपी वाढत असेल तर ते सुरूच ठेवा. तसेच या घटनेनंतर मी रात्रभर झोपू शकलो नसल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments