Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गंगा शुद्धीकरणावर उमा भारती यांची घोषणा

Webdunia
मंगळवार, 8 जुलै 2014 (10:48 IST)
गंगोत्री ते गंगासागरपर्यंतच्या गंगा नदीप्रवाहातील अडथळे दूर करत प्रदूषणमुक्त गंगेचे स्वप्न गंगा पुनरुज्जीवन प्रकल्पातून आखण्यात आले आहे. असे आश्वासन केंद्रीय जलस्रोतमंत्री उमा भारती यांनी दिले. तसेच या कामात सरकार बांधील असून निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही, त्या गंगा मंथन कार्यक्रमात संबोधित करत होत्या.

उमा भारती म्हणाल्या, प्रकल्पाशी संबंधित लोकांशी चर्चा केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधुनिक भगीरथ संबोधत त्यांच्या प्रयत्नांमुळेच गंगा नदीचा अंतर्भाव जलसंपदा विभागात करण्यात आला.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये गंगा शुद्धीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. नरेंद्र मोदी यांनी दोन्ही हात उंचावून भरभरून पाठिंबा दिला. गंगेच्या विषयात मोदी यांना किती आत्मीयता आहे हे माझ्या लक्षात आले. गंगा नदी राष्ट्रीय शुद्धीकरण मोहिमेअंतर्गत एका दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये देश-विदेशातील मान्यवर सहभागी झाले होते. 

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

Show comments