Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुमचे जीवन फार अमूल्य आहे Modi Live News

Webdunia
मंगळवार, 1 सप्टेंबर 2015 (14:17 IST)
- बिहारमध्ये २००५ साली १०१ हेल्थ सेंटर्स होती, मात्र २०१५ सालमध्ये त्यात घट होऊन ती ७० झाली. यावरून बिहार सरकारला लोकांच्या आरोग्याची, प्रकृतीची किती काळजी आहे ते दिसून येतं - मोदींचा टोला.
- सत्तेच्या नशेत बुडालेली लोकं बिहारमधील अभ्यासूू मतदारांना मूर्ख बनवू शकत नाही - मोदी
- बिहार सरकारने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्नच - मोदी
- केंद्र व राज्यामध्ये विकासाची स्पर्धा व्हावी असे मला वाटते, पण अजूनही काही जण जनतेला धोका देतात - मोदी
- गेली २५ वर्ष ज्यांनी जातीयवादाचे विष पसरवले त्यांनाही माझ्यामुळे पॅकेज आणावे लागले - मोदी
- बिहारच्या निवडणुकीत विकास हाच मुद्दा असायला हवा - मोदी
- आम्ही जाहीर केलेल्या पॅकेजची विरोध केला, त्याची खिल्ली उडवली - मोदी
- परदेशातील कार्यक्रमात तरुण मोदी मोदी असा गजर करतात, पण आता ही लोकंही माझ्याच नावाचा गजर करतात - मोदींंचा विरोधकांना टोला
- स्वाभिमान रॅलीत प्रत्येकजण फक्त मोदींवर टीका करत होता - मोदींचा टोला
- महाआघाडीच्या रॅलीत बिहारच्या भविष्यावर भाष्य होईल असे वाटले होते, पण या सभेतून फक्त निराशाच हाती आली, या सभेत बिहारला पुढे नेण्यावर कोणतीच चर्चा झाली नाही - मोदी
- महापुरुषांना तिलांजली देणा-यांना आता जनतेनेच तिलांजली द्यावी - मोदी
- महाआघाडीची स्वाभिमान रॅली ही राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण या महान पुरुषांना तिलांजली देणारी सभा होती - मोदी
- जी लोकं जयप्रकाश नारायण यांचे बोट धरुन राजकारणात आले त्यांनी आता जयप्रकाश नारायण यांना तिलांजली दिली आहे - मोदी
- तुमची नेमकी विचारधारा काय - मोदींचा महाआघाडीच्या नेत्यांना प्रश्न
- राममनोहर लोहिया व त्यांचे समर्थक आयुष्यभर काँग्रेसविरोधात लढत राहिले, देशाला वाचवण्यासाठी तुरुंगात जाऊन सत्याग्रह केला, पण आता त्यांचेच चेले सत्तेच्या लालसेपोटी लोहियांनी ज्यांचा विरोध केला त्यांच्याच सोबत बसले होते - मोदी
- जे आत्ताच आश्वासन पाळत नाही ते पुढे काय करतील - मोदी
- २०१५ मध्ये वीज नाही दिली तर मी मत मागायला येणार नाही असं आश्वासन बिहारमधील विद्यमान सत्ताधा-यांनी केला होता, पण तुम्हाला वीज मिळाली का ? - मोदींचा बिहारमधील जनतेला सवाल
- बिहारमध्ये सत्तेवर बसलेली मंडळी त्यांच्या कामाचा व त्यांच्या कारनाम्यांचा हिशोब द्यायला तयार नाही - मोदी
- स्वत: हिशोब देत नाही पण माझ्याकडे हिशोब मागतात, माझ्याकडे लोकसभा निवडणुकीत हिशोब मागितला पाहिजे - मोदी
- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मी पुन्हा मत मागायला तुमच्याकडे येईन, त्यावेळी मी पाच वर्षात काय काय केले याच हिशोब तुम्हाला देईन - मोदी
- बिहारवर २५ वर्ष राज्य करणा-यांनी त्यांच्या कामाचा हिशोब द्यायला हवा - मोदी
- कितीही राजकीय पक्ष एकत्र यावेत, कितीही खोटा प्रचार करावा पण आता बिहारची जनता विकासासाठीच मतदान करतील - मोदी
- सभेतील गर्दीवरुन बिहारी जनतेचा कल काय आहे हे दिसते - मोदी
- बिहारमधील भागलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला सुरुवात.

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

Show comments