Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नशेत सलमानच गाडी चालवित होता...

Webdunia
नवी दिल्ली- हिट अँड रन प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खानच दारूच्या नशेत गाडी चालवित होता, असे महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले असून त्याला निर्दोष मुक्त करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय बदलावा, अशी मागणी केली. 
 
महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत म्हटले की हा निर्णय अमान्य आणि दिशाभलू करणारा आहे. अपघातावेळी सलमानच कार चालवित होता, असा दावा महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे ऍडव्होकेट जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. सलमानचा वाहनचालक गाडी चालवित होता, या दाव्याला रोहतगी यांनी विरोध केला. 
 
सलमान खानची बाजू प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल यांनी मांडली. या सुनावणीनंतर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 12 फेब्रुवारी ही तारीख निश्‍चित केली आहे.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

Show comments