निवडणुका आल्या की राम मंदिर का आठवते, असा सवाल करीत केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनी भाजपवर जोरदार टीका केली. निवडणुकीत धर्माचा वापर करू नये, असेही त्यांनी भाजपला सुनावले.
येथील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, एका हिंदूच्या डोळ्यात मी माझा ईश्वर पाहू शकेल आणि एक हिंदू माझ्या डोळ्यात आपला भगवान पाहू शकेल, असा दिवस पाहण्याची आपली इच्छा आहे.