Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माझ्या वक्तव्याचा विपर्यास: शाहरुख

Webdunia
गुरूवार, 26 नोव्हेंबर 2015 (12:10 IST)
मुंबई- भारतात खूप असहिष्णुता असल्याचे मी म्हणालोच नाही, असे शाहरुख खान एक कार्यक्रमादरम्यान म्हणाला. मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्या आला, असे त्याने म्हटले.
 
भारतात मोठ्या प्रमाणावर असहिष्णुता अस्तित्वात असल्याचे मत बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या 50 व्या वाढदिवशी व्यक्त केले होते. त्यानंतर शाहरुखवर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती. आमीरने सोमवारी केलेल्या असहिष्णुतेच्या वक्तव्यानंतर हा मुद्दा अधिकच पेटत असल्याचे चित्र आहे. 
 
एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना शाहरुख म्हणाला, ‘मी काहीतरी बोललो आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, आणि त्यामुळे मी अडचणीत पडलो. ते त्रासदायक होते. भारत असहिष्णू आहे, असे मी कधीच बोललो नाही. उलट मला याविषयाबद्दल विचारले असता, बोलण्यात मी रस दाखविला नाही. तरीही मला असहिष्णुतेबाबत सतत प्रश्न विचारले गेले, त्यावर तरुणांनी धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी देश बनविण्यासाठी आपले लक्ष केंद्रित करावे, इतकेच मी म्हणालो होतो.‘‘ 
 
‘लोकांना ज्यावर विश्वास ठेवावासा वाटतो त्यावर ते ठेवतात; पण जे दाखवण्यात आले तसा माझ्या बोलण्याचा अर्थच नव्हता. यामुळे मी खूप निराश झालो आहे. मी एक अभिनेता असून, चित्रपट करतो आणि हे माझ्यासाठी पुरेसे आहे. मी पडद्यावर साकारलेल्या भूमिकांमुळे काही लोकांना प्रेरणा मिळते आणि हेच काम मी करावे, असे मला वाटते,‘‘ असे शाहरुखने म्हटले आहे.

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

Show comments