राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्यातील भैसरोडा भागात नदीत नाव उलटून झालेल्या अपघातात नावेतील चौदा प्रवाशांपैकी दहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चार प्रवाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात यश आले असले तरी इतर दहा प्रवाशांचा नदीत शोध घेतला जात आहे.
एका श्रद्धांजली सभेत भाग घेतल्यानंतर हे सारे प्रवासी नावेने गावाकडे परत जात असताना हा अपघात झाला.