Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रायबरेलीमध्ये रेल्वे अपघात, 15 ठार

Webdunia
शुक्रवार, 20 मार्च 2015 (13:19 IST)
डेहराडूनहून वाराणसीला जाणारी जनता एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरल्याने 15 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि बर्‍याच संख्येत प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रायबरेली जिल्ह्याच्या बछरावां रेल्वे स्थानकाजवळ झाली.   
 
शुक्रवारी सकाळी जनता साधारण एक्सप्रेस बछरावा रेल्वे स्थानकाजवळ  इंजिनच्या मागील दोन डबे रुळांवरुन घसरले. या एक्सप्रेसला बछरावा स्टेशनवर थांबा होता पण गाडी तिथे थांबली नाही व स्टेशनपासून पुढे जाऊन या ट्रेनचे चार डबे रुळांवरुन घसरले. एक्सप्रेसचे ब्रेक न लागल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता आहे.   
 
जखमींना लखनौ, रायबरेली व बछरावा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस व रेल्वेचे पथक मदतकार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले असून रेल्वे मंत्रालयाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

Show comments