Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीनगरमध्ये अडकले हजारो अमरनाथ प्रवासी

Webdunia
श्रीनगर- काश्‍मीर खोऱ्यामध्ये ‘हिज्बुल मुजाहिदीन‘ या संघटनेचा कुख्यात दहशतवादी बुरहान वाणी याच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे सलग तिसर्‍या दिवशीही अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. सुमारे 15 हजार भाविक अडकून पडले आहेत.
 
गेल्या दोन दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या 23 वर पोचली असून, 96 जवानांसह दोन पन्नास लोक जखमी झाले आहेत. या हिंसाचाराचा मोठा फटका अमरनाथ यात्रेला बसला असून, श्रीनगरमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना सुरक्षितपणे माघारी आणण्यात आले. यात्रेकरूंची नव्याने एकही तुकडी अमरनाथच्या दिशेने पाठविण्यात आलेली नाही, असे जम्मूचे पोलिस उपायुक्त सिमरनदीप सिंह यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून काश्‍मीर खोऱ्यातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments