Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेना-भाजप युतीला अखेर सुरुंग!

Webdunia
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (16:28 IST)
आरोप-प्रत्यारोप आणि मानापमान नाटकानंतर अखेर शिवसेना - भाजपाच्या युतीला सुरुंग  लागल्याचे दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मुंबईत विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी नरेंद्र मोदी मुंबईत असताना या कार्यक्रमाकडे शिवसेनेने पाठ फिरवली होती. उद्धव ठाकरेंना उशीराने निमंत्रण दिल्याने शिवसेनेत नाराजी होती. तसेच खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या मुद्द्यावरुनही शिवसेना व भाजपा आमनेसामने उभे ठाकले होते. सत्तेत असूनही सेनेकडून सातत्याने भाजपावर शरसंधान साधले होते. तर युती अबाधित राखण्यासांठी भाजपाच्या नाकी नऊ आले होते. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत युतीसाठी दोन्ही पक्षाचे नेते अनुत्सुक होते.
 
भाजपानेही यंदा जास्त जागा मागितल्याने शिवसेना नेत्यांची यासाठी तयारी नव्हती. अखेरीस दोन्ही पक्षांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

Show comments