Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘सामना’ जाळणे म्हणजे मोदींच्या विचारसरणीची कत्तल

Webdunia
सोमवार, 27 जून 2016 (11:01 IST)
पाकडे मुसलमान, दळभद्री मुस्लिम लीग, ओवेसीची ‘एमआयएम’ आणि धर्मांधांची तळी उचलणारे काँग्रेससारखे लोक ‘सामना’ जाळून स्वत:ची सुंता करून घेत होते, पण आता स्वत:स हिंदुत्ववादी म्हणवून घेणारेही याच सुंतावाल्यांच्या दाढीत बोटे फिरवीत असतील तर हा मूर्खांचा बाजार आहे.

त्यामुळे प्रत्येक स्मार्ट सिटीत किमान पाच-दहा वेड्यांची इस्पितळे उभारण्याची शिफारस आम्ही सरकारकडे करीत आहोत, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

जर शिवसेना आमचे साहित्य जाळत असेल तर शिवसेनेनं सुद्धा त्यांच्या प्रकाशनांच्या जाळपोळीसाठी तयार राहावं असा इशारा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून जोरदार उत्तर दिलं आहे.

मुंबईतील काही फडतूस लोक शिवसेनेस आव्हान देण्याच्या फुसकुल्या सोडून स्वत:च्याच अंतर्वस्त्रांना आगी लावत आहेत अशी बोच-या शब्दात भाजपवर टीका करण्यात आली आहे. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाशी काही घेणेदेणे नसणारेच ‘सामना’ जाळण्याच्या हिरव्या पिचकार्‍या उडवू शकतात. ‘सामना’ जाळणे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला चूड लावणे होय. ‘सामना’ जाळण्याची भाषा करणे म्हणजे मोदींच्या मूळ विचारसरणीची कत्तल करणे होय.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीला, हिंदुत्वाला अग्नी देण्याचीच ही भाषा आहे असे अग्रलेखात म्हटले आहे.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments