Marathi Biodata Maker

वीज कोसळून 14 जणांचा बळी

Webdunia
रविवार, 17 एप्रिल 2022 (15:53 IST)
यावेळी, जिथे देशातील बहुतेक राज्यांमध्ये लोकांना उष्मा आणि आर्द्रतेचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी आसाममधील हवामानात अचानक बदल झाला आहे. काल रात्री येथील विविध भागात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सध्या आसाम मध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून मृतांची संख्या 14 पर्यंत पोहोचली आहे. मृतांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.  
 
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, राज्याच्या गोलपारा, बारपेटा, दिब्रुगढ, कामरूप (मेट्रो), नलबारी जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळ आणि मुसळधार पावसाने उद्रेक केला.
 
वादळामुळे केवळ लोकांचा बळी गेला नाही तर घरांचे नुकसान झाले, झाडे उन्मळून पडली आणि रस्त्यावर पडली आणि वीजवाहिन्या तुटल्या. एएसडीएमएच्या म्हणण्यानुसार, यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

पुढील लेख
Show comments