Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

३१ तासानंतर चकमक संपली, दोन दहशतवादी ठार

Webdunia
गेल्या ३१ तासांच्या चकमकीनंतर जम्मू- काश्मीर येथील श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 
 
श्रीनगरमधील सीआरपीएफच्या तळावर सोमवारी पहाटे दोन दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. पहाटे साडे चारच्या सुमारास दहशतवाद्यांनी तळात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र जवानांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. पहारेकऱ्याला बॅकपॅक आणि शस्त्रे बाळगणाऱ्या दोन संशयित व्यक्ती दिसल्यानंतर त्याने दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४९ व्या बटालियनमधील एक जवान शहीद झाला होता. जवानांकडून चोख प्रत्युत्तर मिळाल्यानंतर दहशतवाद्यांनी करण नगरातील एका पडक्या घरात आश्रय घेतला. यानंतर सुरक्षा दलांनी या घराला वेढा घातला होता. मंगळवारी दुपारपर्यंत ही चकमक सुरु होती. 

संबंधित माहिती

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

Russia-Ukrain War: रशिया युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षां विरोधात अपप्रचार करत असण्याचा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा दावा

भाजपने रचला संपूर्ण कट, घटनेच्या वेळी केजरीवाल घरी नव्हते स्वातीचे आरोप खोटे असल्याचा अतीशी म्हणाल्या

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

पुढील लेख
Show comments