Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चार तास कारमध्ये बंद विद्यार्थ्याची मृत्यू

Webdunia
भोपाळ- शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थ्याला आपले प्राण गमावावे लागले. टाइम्स ऑफ इंडिया यात प्रकाशित बातमीप्रमाणे होशंगाबाद जिल्ह्यात एका सहा वर्षाच्या मुलाची शाळा प्रशासनाच्या चुकीमुळे मृत्यू झाली. तो चार तास कारमध्ये बंद राहिला ज्यामुळे त्याला श्वास रोखला गेला आणि मृत्यू झाली. मुलाची मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. 
 
पोलिसाप्रमाणे होशंगाबाद जवळ एका खाजगी शाळेतील नातिक गौड नावाच्या मुलाला 19 मार्च रोजी भोपाळच्या प्रायव्हेट चाइल्डकेअर स्पेशालिस्टकडे रेफर केले गेले होते आणि रविवारी त्याचा मृत्यू झाला. पोलिसाने या प्रकरणात तक्रार नोंदली असून पुढील चौकशीसाठी होशंगाबाद पाठवण्यात आली आहे. नातिकच्या आई-वडिलांनी आरोप केला आहे की शाळा प्रशासनाने त्याला चार तासाहून अधिक वेळेपर्यंत कारमध्ये बंद सोडले त्यामुळे त्याच्या श्वास घुटमळू लागला. डॉक्टरांप्रमाणे तो श्वास घेण्यात त्रास होत असलेल्या अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये आणले असून तो शॉक्ड होता.
 
वडील सुरेंद्र गौड यांच्याप्रमाणे त्या दिवशी नातिक स्कूल डायरेक्टरच्या कारमध्ये काही शिक्षकांसोबत शाळेत गेला होता. शाळेत पोहचल्यावर नातिकने कारहून बाहेर येण्यास नकार दिला तेव्हा स्कूल डायरेक्टरने नातिकला कारमध्ये बंद केले. नंतर डायरेक्टरने टीचरला नातिकला बाहेर काढण्यास सांगितले परंतू टीचर त्याला कारमधून काढायला विसरली. नंतर तो चार तासाहून अधिक वेळेपर्यंत कारमध्ये बंद राहिला.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments