Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भविष्यात केवळ ‘आधार’ हेच एकमेव ओळखपत्र

Webdunia
शुक्रवार, 24 मार्च 2017 (22:57 IST)
भविष्यात केवळ ‘आधार’ हेच एकमेव ओळखपत्र अस्तित्वात असेल. व्होटर आयडी, पॅनकार्ड हे सर्व ओळख पत्र बाद होऊन सर्व कारणांसाठी आधार कार्ड सक्तीचे असणार आहे. कोणत्याही भारतीय व्यक्तीची संपूर्ण ओळख या एकाच कार्डाच्या माध्यमातून केली जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली. प्राप्तीकर भरताना आधार कार्ड नंबर देणे अनिवार्य केले असून जीएटी लागू होण्याबरोबरच १ जुलै पासून हा नियम लागू होण्याची शक्यता आहे. लोकसभेत खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना जेटली उत्तर देत होते.  वित्तीय विधेयकावरील चर्चेदरम्यान सरकारने वित्तीय विधेयकात तब्बल ४0 सुधारणा सुचवल्या आहे. प्राप्तीकर परतावा अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याच्या सुधारणेचाही समावेश आहे. सरकार येत्या जुलैपासूनच हा नियम लागू करण्याच्या विचारात आहे.

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

पुढील लेख
Show comments