Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इलॉन मस्कनंतर राहुल गांधींनीही EVM वर वक्तव्य केलं, म्हणाले-

Webdunia
रविवार, 16 जून 2024 (17:16 IST)
आपल्या देशात लोकसभा निवडणुका संपल्या असून आता अनेक राज्यांमध्ये विधानसभा आणि पोटनिवडणुकांची तयारी सुरू आहे. मात्र पुन्हा एकदा ईव्हीएमचा जिन्न जागा झाला आहे. खरे तर परदेशातही ईव्हीएमच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही देशात ईव्हीएमद्वारे होणाऱ्या निवडणुकांवर ताशेरे ओढले आहेत.लोकसभा निवडणुकीत भाजपने लोकसभेच्या 240 जागा जिंकल्या आहेत आणि काँग्रेसने 99 लोकसभा जागा जिंकल्या आहेत.

इलॉन मस्कने ईव्हीएम वर वक्तव्य केल्या वर आता काँग्रेचे नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएम वर वक्तव्य केले आहे. ते म्हणाले भारतातील ईव्हीएम हे 'ब्लॅक बॉक्स'सारखे आहे, ज्याला तपासण्याची परवानगी कोणालाही नाही. यावर भर देत काँग्रेस नेते म्हणाले की, आपल्या देशातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राहुल गांधी पुढे म्हणाले की, जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो तेव्हा लोकशाही धोक्याची बनते आणि फसवणुकीची शिकार बनते.

<

EVMs in India are a "black box," and nobody is allowed to scrutinize them.

Serious concerns are being raised about transparency in our electoral process.

Democracy ends up becoming a sham and prone to fraud when institutions lack accountability. https://t.co/nysn5S8DCF pic.twitter.com/7sdTWJXOAb

— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 16, 2024 >

मुंबईच्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून केवळ 48 मतांनी निवडणूक जिंकलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या नातेवाईकाला एक फोन होता, ज्याद्वारे ईव्हीएम अनलॉक होते. राहुल गांधींनी टेस्ला आणि सोशल मीडिया साइटचे सीईओ इलॉन मस्क यांच्या पोस्टलाही टॅग केले. असे होण्याची शक्यता कमी आहे, परंतु तरीही खूप जास्त आहे. असे ते म्हणाले. 

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर, देशात ईव्हीएमद्वारे झालेल्या निवडणुकीत 64 कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले, ज्यामध्ये 31 कोटींहून अधिक महिलांनी मतदान केले.
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

1 जुलै पासून 3 नवीन कायदे होणार लागू, काय परिणाम होतील जाणून घ्या

रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

प्रेयसीचा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीची पोलीस ठाण्याच्या शौचालयात आत्महत्या

अर्जुनाच्या लक्षाप्रमाणे आमचे लक्ष पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे, शरद पवारांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

पुढील लेख
Show comments