Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरनाथ यात्रा संपली

Webdunia
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (16:40 IST)

काश्‍मिरातील अमरनाथ यात्रेची  सांगता झाली आहे. या यात्रेत एकूण 2 लाख 60 हजार यात्रेकरूंनी भाग घेतला. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यानंतरही यात्रेकरूंचा उत्साह कायम राहिलेला दिसला. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अमरनाथ यात्रेचा समारोप होतो. तथापि, अन्य वर्षांच्या तुलनेत यंदा यात्रेकरूंची संख्या कमी होती. गेल्या चौदा वर्षांतील दुसरी लोएस्ट यात्रा समजली जाते. गेल्या वर्षी सर्वात कमी म्हणजे 2 लाख 20 हजार भाविकांनी यात्रेत सहभागी होऊन दर्शन घेतले होते.  प्रथेप्रमाणे साधुंच्या जथ्याने अमरनाथ गुफेपर्यंत छडी मुबारक नेली तेथे त्याची विधिवत पूजा करण्यात आल्यानंतर यात्रा समाप्तीची घोषणा झाली. तेथून छडी मुबारकचा परतीचा प्रवास सुरू झाला असून ही छडी 9 ऑगस्ट रोजी पेहलगाम येथे विसर्जित केली जाणार आहे. 29 जूनपासून ही यात्रा सुरू झाली होती. या यात्राकाळात एकूण 40 यात्रेकरू विविध कारणाने दगावले. त्यात 16 जुलै रोजी जम्मू-श्रीनगर हायवेवर झालेल्या अपघातात ठार झालेल्या 16 यात्रेकरूंचा समावेश आहे.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

पुढील लेख
Show comments