Dharma Sangrah

अमित शहांचा शेतकरी नेत्यांना फोन, चर्चेतून आंदोलनाच्या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता

Webdunia
रविवार, 5 डिसेंबर 2021 (10:13 IST)
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर सरकारनं नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबरोबर फोनवर बोलणं झाल्यानंतर सरकारची भूमिका सकारात्मक जाणवल्याचं शेतकरी नेते युद्धवीर सिंह म्हणाले आहेत.
या मुद्द्यावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन शहा यांनी दिल्याचं युद्धवीर सिंग म्हणाले. तसंच शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यायलाही सरकार तयार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सर्वात महत्त्वाच्या किमान आधारभूत किंमत म्हणजे एमएसपीच्या मुद्द्यावर सरकार समिती स्थापन करण्यास तयार आहे. त्यावर संयुक्त किसान मोर्चा राजी असल्याची माहिती मिळत आहे.
संयुक्त किसान मोर्चानं पाच सदस्यांचं पथक बनवून सरकारबरोबर चर्चेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळं या आंदोलनावर तोडगा निघण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments