Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Andhra Pradesh :शेतकऱ्याने टोमॅटो विकून कमावले 4 कोटी रुपये

Webdunia
सोमवार, 31 जुलै 2023 (10:18 IST)
सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहे. टोमॅटो सामान्य वर्गाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. टोमॅटोमुळे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील 48 वर्षीय शेतकरी मुरली यांनी टोमॅटो विकून भरपूर कमाई केली आहे. अवघ्या दीड महिन्यात त्याने 4 कोटींची कमाई केली आहे.
 
आंध्र प्रदेशातील मुरली लहान असताना एकदा त्याच्या शेतकरी वडिलांनी 50,000 रुपये घरी आणले होते. टोमॅटोचे पीक विकून जे उत्पन्न मिळाले. ते पैसे सुरक्षितपणे कपाटात ठेवल्यानंतर संपूर्ण कुटुंब रोज त्या जागेची पूजा करायचे. तेच पीक एक दिवस त्याला महिन्याभरात करोडोंची कमाई करेल हे तेव्हा मुरलीला फारसे माहीत नव्हते. टोमॅटो मुळे तो करोडपती होईल असे त्याने कल्पना देखील केली नव्हती. खरे तर अलीकडच्या काळात टोमॅटोच्या भावाने विक्रमी उच्चांक गाठला आहे.

ते गेल्या आठ वर्षांपासून टोमॅटोची लागवड करत आहे तरी या भाजीपाल्यातून त्याने कधीही इतकी मोठी कमाई केलेली नाही. मुरली सांगतात की कोलारमध्ये टोमॅटो विकण्यासाठी तो 130 किमीचा प्रवास करत आहे कारण इथल्या एपीएमसी यार्डला चांगली किंमत मिळते.
 
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील करकमंडला गावात मुरली यांचे संयुक्त कुटुंब आहे. त्यांना वारसाहक्काने 12 एकर जमीन मिळाली होती, तर काही वर्षांपूर्वी त्यांनी आणखी 10 एकर जमीन खरेदी केली होती. खरे तर गेल्या वर्षी जुलैमध्ये टोमॅटोचे भाव कोसळल्याने त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले होते. त्यांच्यावर दीड कोटी रुपयांचे कर्ज होते. जो त्याने बियाणे, खते, मजुरी, वाहतूक आणि इतर गोष्टींवर खर्च केला.पीक खराब झाल्यामुळे त्यांना मोठे कष्ट सहन करावे लागले. नंतर नशीब पालटले आणि त्यांना या वर्षी पिकाचा फायदा झाला. 
 
यावर्षी पीक दर्जेदार असून आतापर्यंत 35 पीक काढणी झाल्याचे त्यांनी सांगितले. आणखी 15-20 पिके येण्याची शक्यता आहे. मुरलीचा मुलगा इंजिनीअरिंग तर मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मुरली म्हणाले की, सर्व कर्ज फेडल्यानंतरही 45 दिवसांत 2 कोटी रुपये कमावले आहेत.
 



Edited by - Priya Dixit
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments