Marathi Biodata Maker

बिहारमधील पुराचा 73 लाख लोकांना तडाखा

Webdunia
शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (09:20 IST)
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे राज्यातील पूरस्थिती गंभीर बनली असून राज्यातील एकूण सुमारे 73 लाख लोकांना पुराचा तडाखा बसल्याचा अंदाज आहे. हजारो लोकांना उघड्यावर आश्रय घ्यायला लागला असून या सर्वांपर्यंत सरकारची मदत पोहचू शकलेली नाही. एकूण 14 जिल्ह्यात गंभीर पुरस्थिती उद्‌भवली आहे. सीमांचल, मिथीलांचल आणि कोसी या भागाला सर्वाधिक झळ पोहचली आहे. सुमारे शंभरावर लोक या पुरात दगावले असले तरी सरकारच अधिकृत आकडा मात्र 73 मृत इतकाच आहे. अनेक गावे जलमय झाली असून अद्याप तेथे कोणतीही सरकारी मदत पोहचलेली नाही असे अनेक गावकऱ्यांनी सांगितले. आम्ही केवळ देवदयेवर तगून आहोत असे अनेक गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान सरकारी सूत्रांनी सांगितले की राज्य सरकारने आत्ता पर्यंत पूरग्रस्तांसाठी 504 मदत छावण्या उभारल्या असून त्यात सुमारे एक लाख लोकांनी आश्रय घेतला आहे. तंबु, प्लॅस्टिक कागद पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण त्याची मोठी टंचाई असून जादाची मदत सामग्री उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे असे या सूत्रांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

पुढील लेख
Show comments